Thursday, July 30, 2009

अंतरे वाढली तरी

काही चेहर्‍यानी जगायला शिकवले,
काहींनी जिवापाड जपले.
अंतरे वाढली तरी
काही हात कधीच हातून सुटले नाहीत

कधी एका संध्याकाळी


कधी एका संध्याकाळी,
भेटली एक जुनी आठवण
हरवलो क्षणभर त्या बालपणात,
आसमंत दरवळला आठवणीने

ना जाणे का आज पुन्हा,
हरवण्याची उभारी जागते आहे
शोधावे कुणीतरी ह्या इच्छेने,
परत लपंडाव खेळावेसे वाटते आहे

साम्राज्य उभारायचे तर---

व्यकती महत्वाची नसून
ध्येय महत्वाचे
हे समजायला "अहम्"
सोडून लढ़णारे लोक लागतात

साम्राज्य उभारायचे तर
सोबत श्रध्दा बाळगणारे मावळे लागतात
अन तोफेचा आवाज़ येई पर्यंत
लढ़णारे बाजी लगतात

राजा कुणी उगाच होत नसतो
कुणालाही घड़वण्यात
इतराच्या रक्ताचे
पाट वाहत आसतात

क्षण काही वेचले



क्षण काही वेचले,
जपले अलगद ह्रदयाशी,
भाव तव मनीचे जाणले,
जाणता ना जाणता

गंध दरवळला मनी,
धुंदल्या दाही दिशा,
जीव गुंतला कधी ना कळे,
जाणता ना जाणता

आज मी उदास आहे

घे तव कुशीत की,
आज मी उदास आहे
नभ दाटले अंबरी जरी,
तरीही मनी तुझीच आस आहे

सांग मज कधी,
व्यथा तव मनीची
मलाही कळुदे कधी की,
कुणीतरी आसपास आहे

भावबंध का सांग कुणी,
व्यर्थ असे हे जोडते
जोडताना एक एक अक्षर,
मी तुलाच शोधतो आहे.

शब्दांपलीकडले

शब्दांपलीकडले शोधताना,
पुन्हा शब्दांचा आधार घ्यावा लागला
भावना मनीच्या मांडताना,
पुन्हा श्रोत्यांचा आधार घ्यावा लागला

बंधन पाश सैल करूनी,
धावलो दहिदिशा ध्येयासक्तीने
पाउले थकली सांजवेळी तेव्हा,
पुन्हा घराचा आधार घ्यावा लागला