Thursday, April 23, 2009

ध्यास


झेप ऊंच घेण्यासाठी
लागतो गगनभरारीचा ध्यास

लागते पंखात बळ
अन् "हो पुढ़े" म्हणणारा पाठीवर मायेचा हा

बरेच काही बोललो


बरेच काही बोललो पण,

महत्वाचे तेवढेच राहून गेले

तू माघारी जाताना,
पाठमोरे पाहायाचे राहून गेले


घरट्यातून बाहेर पड़ताना,
अंगन सुट्ले हे माहीत होते

ओढ़ मनी तव सदैव राहील,
हे घराला सांगणे राहून गेले

जिंकलेले सगळे किल्ले परत देताना,
एक किल्ल्ला मागायचे राहून गेले

बरेच काही बोललो पण,
महत्वाचे तेवढेच राहून गेले

आभास

किती आभासात,किती आकारात
शोधू तुला मी

येता आठवण तुझी पुन्हा
सांग कुठे भेटु तुला मी

शोध

देवळात देव शोधणं,
माणसात माणूस शोधण्यापेक्षा सोप असतं

गीतेची एक ओळ आत्मसात करण्याऐवजी,
रोज अख्खी गीता वाचणं सोप असतं